तुळजापूर:चलो तुळजापूर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश राणे याचं अहवान…
मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी आज पर्व तिसरे जाहीर केले चलो तुळजापूर व एल्गार मराठ्यांचा आणि जागर आई भवानीचा असा नारा देत शुक्रवार दिनांक ०९/१०/२०२० रोजी सकाळी ११;०० वा पर्व तिसरे ची आज घोषणा केली
मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असताना आत मराठा समाज शांत राहण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही अश्या वेळी राज्य सरकार मराठा समाजाला काही योजना जाहीर करत आहे परंतु मराठा या योजनांवर अजिबात अनुकूल नसून मराठा आरक्षण हीच एकमेव मागणी आज मराठा समाज सरकार समोर ठेवत आहे सरकार वर मराठा समाजाचा विश्वास राहिलेला नाही असे थेट आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक करत आहेत.या पुढे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढणार हे मात्र निश्चित आहे या बाबत सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहणे महत्वाचे आहे ठोक मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यातील युवकांना चलो तुळजापूर ची घोषणा केली या पुढे सरकार ची डोकेदुखी वाढणार असून आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.












Leave a Reply