सातारा
अधिकाऱ्यांचे आवाहन
वडूथ ग्रामसेवक व तलाठी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,
“आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करा. अन्यथा खरीप हंगामातील ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही. शेतकरी बांधवांनी यात विलंब करू नये.”
शेतकऱ्यांना ७/१२ मिळण्यासाठी ई-पिक पाहणी बंधनकारक
राज्य शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ पासून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय लागू केला आहे. आता ई-पिक पाहणी पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही.
ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर “ई-पिक पाहणी (e-Peek Pahani)” हे अॅप डाउनलोड करून आपल्या शेताची व पिकांची नोंदणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
🟢 ई-पिक पाहणी का महत्वाची?
शेतकऱ्यांच्या जमिनीवरील प्रत्यक्ष पीकस्थितीची नोंद शासनाकडे तात्काळ उपलब्ध होईल.
पिकांचा विमा, कर्जमाफी, अनुदाने, शासकीय योजना यांचा लाभ तत्काळ व अचूक मिळणार.
जमिनीवरील खरी पिकस्थितीच्या आधारेच पुढील शासकीय निर्णय व मदत मिळेल.
🟢 शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना:
आपल्या मोबाईलवर e-Peek Pahani App त्वरित डाउनलोड करा.
आपल्या शेताची व पिकांची माहिती नीट भरून वेळेत सबमिट करा.
पाहणी पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ७/१२ उतारा ऑनलाइन किंवा तलाठी कार्यालयातून मिळणार आहे.












Leave a Reply