रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे काम
सातारा –प्रतिनिधी
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे वडूथ येथील जरंडेश्वर रेल्वे पुलाखाली पावसाचेपाणी साठते.सतत अपघात होत असून तत्काळ येथील अडचणी दूर करण्यासाठी वडूथ व आसगावकर यांनी रेल रोको आंदोलनचा इशारा वडूथ,आसगावकरांनी दिला
गेली १६ महिन्यांपासून जरंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळ वडूथ ,आसगाव रस्त्यावर नव्याने पुलाचे बांधकाम झाले आहे पण या पुलाचेबांधकाम करणाऱ्या अभियंत्याने आणि ठेकेदाराने घाईघाईत काम करताना अनेक चुका केल्या आहेत , निकृष्ट दर्जाचे काम झाल्यानेपावसात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.यात पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साठते, मोठ्या प्रमाणात चिखल ही होत आहे.यामुळेदुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेक जण घसरून पडतात.याबद्दल रेल्वे प्रशासनाला कळवले, भेटायला गेलेल्यास्थानिकांचे ऐकून हि घेतले जात नाही.यामुळे चिडलेल्या स्थानिक नागरिकांकडून अचानक रेल रोको आंदोलन करण्याची तयारी सुरूकेली आहे .
वडूथ ते जरंडेश्वर रेल्वे रस्ताचे काम ही निकृष्ट दर्जाचे झाले आहे
रेल्वे प्रशासन व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी व जनतेला या अडचणीतून मुक्त करावे
मदन साबळे
जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा












Leave a Reply