दहिवडी: महाराष्ट्र राज्य सरकार ने सावकारी अधिनियम कायदा २०१४ असा करण्यात आलं त्या मुळे अनेक सावकाराचे कंबरडे मोडले होते या कायद्याची दहशत मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली परंतु अनेकदा शेतजमीन या गहाण ठेवल्या जातात आणि मुदत संपण्याच्या पूर्वी काही सावकार ती जमीन इतर मार्गाने लुबाडण्याचे प्रयत्न करत असतो जर ती जमीन सावकार शेतकऱ्यांना पुन्हा देत नसेल तर शेतकरी हा न्यायलाया कडे जात असतो परंतु महाराष्ट्र सावकारी अधिनियम२०१४ चा कायदा हा त्या शेतकऱ्यांना जमीन पुन्हा मिळवून देत असतो अशी तरदूत तसेच सावकारावर गुन्हा दाखल केला जतो असा गुन्हा अजामीनपात्र आहे सध्या माण तालुक्यात अश्या अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहेत या बाबत उपनिबंधक यांच्या कडून माहिती घेतली असता असे अर्ज आलेच सागितले व लवकरात लवकर चुकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे तसेच माण मध्ये काही लोक महिलांचा ग्रुप बनवून खाजगी बचतगट तयार करत आहेत व तो पैसे व्याजाच्या रुपात चालवत आहेत त्यातून जमिनी ताब्यात घेण्याचे प्रमाण वाढले वडजल ता माण येथेही प्रकार घडल्याची तक्रार सहकार विभागाकडे आलाय असून या प्रकारची सखोल चौकशी सहकार विभाग करत आहे असे प्रकार गंभीर असून लोकांनी न घाबरत समोर येऊन तक्रार करावी असे अहवान करण्यात आले आहे..
Leave a Reply