विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निलम गोऱ्हे बिनविरोध; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वार्ताहर मुंबई:विधासपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निलम गोऱ्हे यांची दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधासपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे. ही निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं. तर या निवडणुकीला आक्षेप घेत भाजपने कोर्टात धाव घेतली आहे.आज ही निवडणूक पार पडली. यावेळी कोर्टात प्रकरण असल्याने ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक घेण्याचा हा सभापतीचा अधिकार असून तो न्यायालयीन कक्षेत येत नाही, असं सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक घेतली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानानंतर निलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली.नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर निलम गोऱ्हे यांना साहित्याची जाण असून त्या मानवी हक्क आणि स्त्रियांच्या प्रश्नावर नेहमीच धावून जातात. त्यांची उपसभापतीपदी निवड ही योग्यच असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं. तसेच निलम गोऱ्हे यांचा पायगुण चांगला असल्यानेच शिवसेनेची राज्यात सत्ता आल्याचंही त्यांनी सांगितलं. आमदार म्हणून गोऱ्हे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदाच होईल, असंही ते म्हणाले.दरम्यान, विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीबाबत कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. कोणत्याही उमेदवाराला उमेदवारीपासून आणि मतदानापासून वंचित ठेवणं चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘काल बहुमताच्या जोरावर सभापतींनी उपसभापतीची निवडणूक घोषित केली. त्यावेळी आम्ही आक्षेप घेतला. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत कोविड रुग्णांनी सभागृहात येऊ नये. तसेच वयोवृध्द आमदारांनी येऊ नये असे ठरविण्यात आले. पण आता तेच सभापती सभागृहात न येणाऱ्या आमदारांच्या हक्कांवर गदा आणत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. अनुपस्थित आमदार आपला हक्क कसा बजावणार ? हे आम्ही न्यायालयाला याचिकेच्या माध्यमातून विचारले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे. पण या निर्णयामुळे त्यांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला यासंदर्भात विनंती केली आहे,’ अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *